” एअर इंडिया विमान क्रमांक… मुंबई ते दिल्ली तीन तास उशीरा उड्डाण करेल.”
प्रवाशांकरिता असलेली सूचना ऐकून ती त्रासली.
“याला काय अर्थय?? तीन तास उशीरा???”
तिच्या शेजारीच बसलेला मुलगा हसला. तिने रोखून त्याच्याकडे पाहिलं.
त्याने मुकाट्याने मान दुसरीकडे वळवली. आता तीन तास काय करायचं या विचारानेच ती विचलित झाली. पर्समधील वही काढून ती काही लिहायला सुचतयं का पहात होती. शिर्षक टाकलं
‘ भरकटलेलं उड्डाण’
आपल्याकडे रोखलेल्या नजरेने ती अस्वस्थ झाली. शेवटी भीती प्रत्येकालाचं वाटते. त्या नजरेने आरपार आणि घट्ट कोंडलेल्या मअनोळखी नजरेचीनाचा वेध घेऊ नये,असं वाटतं. गुपीतं ही अशी सहज कुणाच्या हातात पडली की त्याचा उपयोग भावनांच्या विरोधात होतोच मग विश्वासाची लक्तरं वेशीवर टांगली गेली समजायचं !
ती त्याच्याकडे पाहून कसनुसं हसली. त्याचं हसणं
फारचं मधाळं होतं. तिच्या मनातली अढी थोडी सैलसर झाली. हसणं माणसं जोडतं, काळीज घायाळ करतं आणि अस्तित्वाची जाणीव करून देतं. ती हातातल्या पेनाशी ती खेळत बसली. नेमकं वेळेला काही आठवत नाही लिहायला, तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या.
“तुम्ही लिहीता??” त्याने थोडं घाबरत विचारलं.
“सगळेचं लिहितात. लहानपणापासून शिकवतातच ना??”
“न्.. नाही..म् म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही लेखिका आहात का?”
“नाही. मला जे वाटतं ते उतरवते कागदावर.. गरळ ओकणं म्हणू शकता..”
“ओह्..सॉरी..मी सहजच बोलून गेलो.” काहीसं अवघडून तो दुसरीकडे बघू लागला.
आपली चूक लक्षात आल्यावर ती म्हणाली,
“तुम्ही पण याच विमानाने जातायं का? उशीर झालेल्या??”
“नाही..मी बॅंगलोरला जातोय. माझी फ्लाईट रद्द झालीये. आता पुढची आहे ती बऱ्याच उशीरा आहे.”
“ओह् अच्छा. आयटी मध्ये का?”
“हो.. तुम्ही?”
“मी पुरातनशास्त्रात पदवी घेतली आहे. दिल्ली ला एक प्रोजेक्ट साठी जातेयं.”
“क्या बातं..!”
ती हसली. या व्यक्तीपासून काही धोका नाही, असं तिला वाटलं. तीन तासांत थोडंफार बोलायला कुणीतरी मिळालं तितकाच टाईमपास.!
“तुम्ही गरळ ओकता म्हणजे काय करता?” त्याचा प्रश्न.
“हाहाहा…म्हणजे मला जे जे मनात विचार येतात ते ते मांडते.. प्रत्येकवेळी आपण सगळ्या गोष्टी लोकांना सांगू शकत नाही किंवा कुणी ऐकून घेऊ शकत नाही.”
“जसे की??”
तिने त्याच्यासमोर डायरी धरली. सुबक अक्षराने तो मोहून गेला.
‘ पाठमोऱ्या तुला जाताना पाहून
थोडं थांब म्हणावं वाटलं
मनातलं गुपित सारं
सांगावसं वाटलं..!’
“व्वा… प्रेमकविता …मस्तचं..!” तो वही तिच्याजवळ देत म्हणाला.
“धन्यवाद. “
“स्वानुभव?? “
“नाही हो…लोकांच्या अनुभवातून लिहायचं.”
“अरे तुरे बोललीस तरी चालेल.”
“मी सगळ्यांशी असचं बोलते.”
“आदरार्थी की अपमान करायच्या हेतूने.?”
“नाही.. आदरार्थीच.”
“राजघराण्यातील आहात का??”
“नाही हो. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी आदराने बोलावं.”
“मोठ्या?? मी मोठायं?? कशावरून?”
“हाहाहाहा…हवेत गोळी मारली.”
“काय गोळी मारली?”
“तिशी पस्तीशीचे असाल!”
” एकोणतीस..! इतका वयस्कर दिसतो का मी?”
“तेच ते एकोणतिशी तिशी. जे काही असो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात.”
“तुझं वय काय?”
“लोकांच्या नुसार माझं वयं बदलत जातं”
“म्हणजे.?”
“सव्वीशीपासून पस्तिशीपर्यंत!! कधी कधी माझाच गोंधळ उडतो खरं वयं काय??”
“लोकांना दूर ठेवायची आयडिया आहे का ही?? छान आहे.”
“नाही हो. मी वयाचा गैरसमज काढत बसत नाही. उगाचंच फाटे फुटतात.”
“मिस्टीरियस !”
“होय. काही अंशी चांगलं असतं ते.”
“ओह्. मला देखील कुणाचं खोदून काढायला आवडतं नाही. अपेक्षा करू नका हा माझा नियम आहे.”
“तसही नाही.”
“मग ?”
“सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी माहित असायला हव्यात अशी आपल्या समाजाचा अट्टाहास असतो. आणि सगळ्या गोष्टी फार थोड्या लोकांना माहिती असणं आवश्यक, असं माझं मत आहे. अनलिमिटेड ॲक्सेस इज ए की ऑफ हॅपिनेस!!”
“मी याबाबत असहमत आहे. ज्या लोकांनी समाजात पारदर्शकता आणि समानता आणायचा प्रयत्न केला त्यांच्या मताच्या विरूद्ध आहे हे. विषय भरकटतोय इथे. सॉरी.”
“नाही नाही. थांबा मला काय सांगायचं आहे, मी काय करते , कुठे रहाते, माझ्या आयुष्यात काय चालू आहे यावरून लोक मला पारखून घेतात आणि त्यानुसार माझ्याबद्दल मत तयार करतात. पारदर्शकता विचारांची असावी, असं मला वाटतं. कुणाचीच वैयक्तिक आयुष्य तितकी सुखाची आणि ऐशारामी नसतात. वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचा एक स्तर ठरवून त्यानुसार व्यक्तीची लायकी काढणं पटत नाही.”
“ओह..बरोबर आहे.म्हणूनचं मी म्हणालो मी कोणाचं काही खोदून काढतं नाही. वय विचारल्याबद्दल माफी असावी.”
“मी सर्वसमावेशक बोलले. तुम्हालाच उद्देशून नाही. आणि माझं वय सत्तावीस आहे.”
“अच्छा..पण हे सांगायला माझ्याकडून प्रेशर केलं गेलं नाही ना? कधी कधी आपण दुसऱ्यावर किती दबाव आणतो ते लक्षात येत नाही.”
” नाही हो. अजिबात नाही.”
“पण हे सव्वीस ते पस्तीस अशी वयोमर्यादा का?”
“कारण कुणाला मी फार तरुण वाटते. अगदी बारावी पास..कुणाला वाटतं खूप शिकली मग तिशी तर नक्कीच असेल आणि लग्न झालं नाही अजून म्हणून अजून भुवया उंचावतात.”
“अरे बापरे…मी त्या जागी असतो तर एवढ्या मानहानीने हॉस्पिटलमध्ये भरती झालो असतो. मुलींना कशाकशाला सामोरं जावं लागतं..औघड आहे.”
“हाहाहा…मी लोड घेत नाही इतका..”
“लग्न का नाही केलं?? सहजच विचारतोय.”
“मी त्याबाबत आळशी प्राणी आहे.”
“आळशी काय? पार्टनर असावा असं तुला वाटतं नाही?”
“वाटतं पण मला हवा तसा मिळणं अवघड आहे.”
“मी स्वच्छंदी आहे. स्वच्छंदी पाखरू पिंजऱ्यात राहत नाही.”
“म्हणजे?”
“व्वा.”
“हममम्..वेळ काय झाली?”
“आताशी एक तास सरला आहे. अजून दोन तास बाकी आहे.”
“वेळ नावाचं गणित किंवा दिवस मोजणं मला कायम आकर्षित करत आलयं.”
“बापरे…”
“वेळ हा न संपणारा विषय आहे. असून नसल्यासारखे आहे तो.”
“पण वेळ मोजायचा का?? तिथून सुरुवात होते.”
“हवं तेव्हा मोजावं. उगाच त्याच्यावर बंधन कशाला??”
“पण वेळ निर्जीव आहे ना?”
“वेळ सजीव आहे. त्याशिवाय का आठवणी ताज्या राहतात??”
” मला अशा सिरियस गोष्टींची भीती वाटते यार…”
“हाहाहा..सॉरी…मी अचानक सिरियस होते. दुसऱ्या विश्वात जावून पोहोचते.”
“आता कोणत्या विश्वात आहेस.?? तिथला सुगंध घेऊन येशील मला?”
“नाही..”
“का ?”
“ते माझ्याजवळ राहिलेलं बरं.. आपल्या गंभीरतेचा किंवा दु:खाचा गंध दुसऱ्याला देऊ नये.”
“असं एकट्याने सुद्धा सहन करु नये.”
” अ…म्…कॉफी घेणार?”
“आणतो… बसं..”
गरमागरम कॉफीचा कप त्याने तिच्यासमोर मांडला.
” हे घे..”
“थॅंक्स”
“कोणती पुस्तकं आवडतात वाचायला?”
“सगळीच..कथा कादंबरी नाटक ललित कविता…”
“विषय छान बदलतेस तर!”
“कोणता?”
“मघाचा…प्रेमात वैगरे आहे का?”
“नाही रे…”
“इतकं भावनाप्रधान आणि विषय थांबवायचं कौशल्य त्यातूनच येतं. “
“असेलही…पण इथे ते लागू होत नाही.”
“डोळे आणि बुद्धी एका वेळी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले की खोटं समजावं.”
“म्हणजे…”
“काही नाही.”
” तू सुद्धा लिहीतो का?”
“हाहा माऊली…असं नाही हो काही..”
“माऊली?”
” हे विश्वची माझे घरं…सगळी आपलीच माणसं..आपलेचं नातेवाईक.”
“नातेवाईक?”
” बोलण्यात गुंतलोय आपण…अनोळखी असूनही. म्हणून शब्दांनी जोडलोय.”
“बरं…”
“खरं..”
“मस्करी करतोय ?”
“अजिबात नाही.”
“चांगुलपणाची पट्टी बांधलीये डोळ्यांवर?”
“कशासाठी,?”
“अंधारात चाचपडलेला माणूस कुठेही चालू शकतो न धडपड्या.तसं दुःखें भोगलेला माणूस चांगलाच वागतो.”
“लेखिकेशी बोलण्याचं थ्रील मात्र सेक्सी असतं. इतक्या वन लायनर्स मी पहिल्यांदा ऐकतोय.”
“हाहा…आणि तितकंच हॉररसुद्धा”
“घाबरवतेय?”
“तसं समजं.”
” तू स्वत: घाबरतेय.”
“काहीही”
“इतकं कोषात राहू नये माणसाने…किती भावना कोंडून वरवरचं जगतेयं.”
“असं तुला वाटतयं.”
” झालं..खोटं तर खोटं..पण इतकं पुस्तकी का वागतेय. आतून एक बाहेरून एक. सांगायचं तर तुला खूप काही आहे, पण अनोळखी म्हणून टाळतेय..खरं ना?”
” पण सगळ्याच गोष्टी का सांगाव्या?? आणि तुझ्यावर विश्वास का ठेवावा?
“कारण कधी कधी अनोळखी जागा माणसं व्यक्त होण्यासाठी योग्य असतातच. त्यांना पार्श्र्वभूमी माहिती नसते. ती तटस्थ असतात.”
“………….”
“आणि मी तुला पुन्हा कधी भेटणारही नाही.त्यामुळे माझ्याकडून काय धोका?”
“………..”
“असो..”
“एका मुलावर प्रेम आहे. पण लग्नासाठी तयार नाही. जर पुढे काही होणार नव्हतं, भूमिका नव्हती तर प्रेमाचा अट्टाहास कशासाठी?? चिडचिड होतेय. तणाव येतोय.”
“परिस्थितीने हतबल असेल. आणि न घडणाऱ्या गोष्टी लवकर झटकून मोकळ्या व्हाव्यात. नाही तर त्या पोखरुन काढतात आयुष्य.”
“पण त्याला दोषी मानावं?”
“प्रेम असेल तर तो तुला कधी अंतर देणार नाही. पण भावनेच्या भरात निर्णय घेऊन अंतर दिलं तर इथपर्यंत सोबत होती मान्य करावं आणि पुढे चालावं.”
“मग माझ्या भावनांचं काय?”
“भावना आधी तीव्र असतात नंतर सौम्य होत जातात. विसरशील सगळं हळूहळू.”
“दुसऱ्याशी लग्न केल तर नवऱ्याशी प्रतारणा होणार नाही का?”
“अजिबात नाही”
“कसं??”
“कारण तू त्यावेळी स्वतंत्र असशील. कालांतराने प्रेमही होईल. पण लग्नानंतर तू आधीच्या प्रेमाचाच जपनाम केलास तर ती प्रतारणा ठरेल.”
” थोडं थोडं पटतंय तुझं..”
“एका वेळी खूप प्रॉब्लेम आले की सुटे करून ठेवायचे नाही तर गुंता होतो.”
“थॅंक्स..तू खूपच चांगला आहे.”
“आणि तू खूप अवखळ पण निरागसं.!”
“फ्लाईटची अनाउन्समेंट झालीये. येते मी..”
“असचं अर्ध्यावर सोडून..??”
“हो…”
“पुन्हा भेटशील??”
“माहित नाही..”
“तिथे जाशील तिथले सुगंध जमा करून ठेवं..मला कधी भेट झाली तर दे…”
“प्रयत्न करेल..”
“ओळख तरी सांगशील?”
“नावातं काय आहे?”
“आठवणं म्हणून..”
“रजनी…”
“चांदणं तुला भरभरून सौंदर्य देवो.”
“तुझं??”
“चिखलातही उमलू पहाणारा..”
“मिस्टीरियस…”
“होयं…”
“येते… बोलून छान वाटलं.”
“मलाही..”
“बाय…”
“हमम्”
ती पाठमोरी वळून निघून गेली.
बाकावर दुमडलेल्या डायरीतलं पान विरहाने फडफडलं..